अमित शहांशी मुख्यमंत्रीपदावर चर्चा नाही:अजित पवारांनी CM पद मागितल्याचे वृत्त फेटाळले, मैत्रीपूर्ण लढतीत अर्थ नसल्याचा दावा
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचे वृत्त फेटाळले आहे. मी अमित शहा यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. पण आमच्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती आणि मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. यासंबंधी एका इंग्रजी दैनिकाने दिलेले वृत्त निखालस खोटे आहे, मैत्रीपूर्ण लढतीला काहीही अर्थ नसतो, असे अजित पवार म्हणालेत. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीच्या घटकपक्षांमध्ये 288 पैकी काही जागांवर मतैक्य ठरले आहे. इतर जागावाटपावर अजून काही ठरलेले नाही, पण जसे जागावाटप फायनल होईल तशी माहिती मी आपल्याला देईन. पण माझे मत असे आहे की, अशा मै़त्रीपूर्ण लढतीना कोणताही अर्थ नसतो. आम्ही आघाडीत असतानाही अशी निवडणूक कधी लढली नाही, असे त्यांनी माध्यमांना म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होणार आणि त्या सर्व थापा आहेत, असे काहीच होणार नाही. आम्ही सर्व जण बैठक घेऊन 288 जागापैंकी महायुतीमधील कुठल्या कुठल्या पक्षाला द्यायच्या हे काही ठरले आहे, काही बाकी आहे. हे जेव्हा आमचे ठरेल तेव्हा मी यासंदर्भात माहिती देईल. महायुतीच्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचवणे हे आमचे लक्ष आहे, त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. भाजप आणि शिवसेनेच्या जाहिरातीवर तुमचा फोटो नाही या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मीच माझा फोटो तुमच्या जाहिरातीमध्ये लावू नका, माझे फारच फोटो सगळीकडे झाले थोडे कमी करावे म्हणून असे सांगितल्याचे म्हणत त्यांनी विषय टाळला. लाडकी बहिण योजना ही महायुतीची सोजना आहे, त्यामुळे घटक पक्ष आपआपल्या परिने मांडण्याचा प्रयत्न करणार आणि महायुती म्हणून मांडणार. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा अजित पवार म्हणाले की, राज्यात कापूस, सोयाबिनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सध्या आपल्याला कांदा निर्यात बंदी होऊ द्यायची नाही. शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातून मिळत असतील तर मे मिळायला हवे अशा विषयावर माझी अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली. हे ही वृत्त वाचा अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी:अमित शहांकडे राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह; विमानतळावर घेतली भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची मागणी केल्याचे वृत्त फेटाळले आहे. मी अमित शहा यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. पण आमच्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढती आणि मुख्यमंत्रीपदाच्या मुद्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. यासंबंधी एका इंग्रजी दैनिकाने दिलेले वृत्त निखालस खोटे आहे, मैत्रीपूर्ण लढतीला काहीही अर्थ नसतो, असे अजित पवार म्हणालेत. अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, महायुतीच्या घटकपक्षांमध्ये 288 पैकी काही जागांवर मतैक्य ठरले आहे. इतर जागावाटपावर अजून काही ठरलेले नाही, पण जसे जागावाटप फायनल होईल तशी माहिती मी आपल्याला देईन. पण माझे मत असे आहे की, अशा मै़त्रीपूर्ण लढतीना कोणताही अर्थ नसतो. आम्ही आघाडीत असतानाही अशी निवडणूक कधी लढली नाही, असे त्यांनी माध्यमांना म्हटले आहे. अजित पवार म्हणाले की, मैत्रीपूर्ण लढत होणार आणि त्या सर्व थापा आहेत, असे काहीच होणार नाही. आम्ही सर्व जण बैठक घेऊन 288 जागापैंकी महायुतीमधील कुठल्या कुठल्या पक्षाला द्यायच्या हे काही ठरले आहे, काही बाकी आहे. हे जेव्हा आमचे ठरेल तेव्हा मी यासंदर्भात माहिती देईल. महायुतीच्या योजना लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहचवणे हे आमचे लक्ष आहे, त्यादृष्टीने आम्ही काम करत आहोत. भाजप आणि शिवसेनेच्या जाहिरातीवर तुमचा फोटो नाही या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, भाजप आणि एकनाथ शिंदे यांना मीच माझा फोटो तुमच्या जाहिरातीमध्ये लावू नका, माझे फारच फोटो सगळीकडे झाले थोडे कमी करावे म्हणून असे सांगितल्याचे म्हणत त्यांनी विषय टाळला. लाडकी बहिण योजना ही महायुतीची सोजना आहे, त्यामुळे घटक पक्ष आपआपल्या परिने मांडण्याचा प्रयत्न करणार आणि महायुती म्हणून मांडणार. शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा अजित पवार म्हणाले की, राज्यात कापूस, सोयाबिनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सध्या आपल्याला कांदा निर्यात बंदी होऊ द्यायची नाही. शेतकऱ्यांना दोन पैसे त्यातून मिळत असतील तर मे मिळायला हवे अशा विषयावर माझी अमित शहा यांच्यासोबत चर्चा झाली. हे ही वृत्त वाचा अजित पवारांकडून थेट मुख्यमंत्रिपदाची मागणी:अमित शहांकडे राज्यातही बिहार पॅटर्न राबवण्याचा आग्रह; विमानतळावर घेतली भेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर आले असता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची मुंबई विमानतळावर भेट घेतली. यावेळी या दोन्ही नेत्यांमध्ये जागा वाटपाच्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत अजित पवार यांनी उघडपणे आपल्या मनातील मुख्यमंत्री पदाची मागणी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. राज्यांमध्ये देखील बिहार पॅटर्न राबवा आणि मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घोषित करा, अशी मागणी त्यांनी अमित शहा यांच्याकडे केली असल्याची दावा 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.
What's Your Reaction?






